Pages

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

माझ्या गावाकडील इलेक्शन....!

#माझ्या_गावाकडील_इलेक्शन.....!

उद्या जिल्हा परीषद आणि पंचायत समिती यांचे पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. प्रचाराची रणधुमाळी काल संपली. मतदानाला जाणार कि नाही याबाबत अजूनही माझी साशंकता होती.  परंतु एक सुज्ञान नागरिक आणि सामाजिक भान ठेऊन मतदानाला जायला पाहिजे अस म्हणत एका मनाने दुसर्या मनावर विजय मिळवला आणि सर्व संभ्रम दूर करून आता मतदानाला जायचच अस ठरवलंय. 
परंतु त्याही पेक्षा एक आदर्श व्यक्तिमत्व आणि  कार्यक्षम उमेदवार या जिल्हा परिषदेच्या बोटा गटातून  निवडणुकीच्या रिंगणात उभा असल्यामुळे आणि माझे त्यांच्याबरोबर एक भावनिक आणि प्रेरणादायी नात असल्यामूळे मतदानाच्या स्वरुपात त्यांना साथ देण हेहि मी माझ कर्तव्यच समजतो.

माझ्यासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व *गागरे बंधु*....!
खूप दिवसांपासून निवडणुकीची उत्सुकता होती आणि त्यात बरेच दिवस थोडेफार त्याबद्दल आढावे देखील घेत आहे. शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांपेक्षाही व्यक्तीची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळेच एक कार्यक्षम असे व्यक्तीमत्व  या भागाच्या विकासात मुख्य भूमिका बजावेल असे माझे मत आहे  आणि माझ्या मते ते व्यक्तिमत्व असेल गागरे बंधू.

तसे पहायला गेले तर कॉंग्रेसचे नेतृत्व करणारे बाळासाहेब थोरात आणि आझ्या कुटुंबियांचे चांगले सबंध आहे. अनेक सुखदुखात ते आमच्या बरोबर उभे राहिले आहे. एव्हढेच काय म्हसवंडीच्या विकासामध्ये म्हणजेच पाणलोट प्रकल्पामध्ये त्यांचा खरच मोलाचा वाटा आहे परंतु प्रश्न असा आहे कि उमेदवार कोण आहे ?
पक्ष म्हणून नाही तर उमेदवार म्हणून मला मतदान करायचे आहे त्यामुळे मी नक्कीच थोडा वेगळा विचार करीन.

त्यामुळे एक व्यक्ती म्हणून त्याला समांतर असा उमेदवार, एक व्हिजनरी, ध्येयवादी , निर्णयक्षम आणि कार्यक्षम असे व्यक्तीमत्व मी निसंकोश करून सांगेल ते म्हणजे गागरे बंधू.
कारण त्याच्यामागे एक सामान्य नागरिक म्हणून माझा  वयक्तिक अनुभव आहे.

माझ्यासोबत घडलेला आणि गागरे साहेबांचा वाटा असलेला एक खूपच भावनिक प्रसंग मला आठवतो.

साधारण एक वर्षापूर्वी पुण्यामध्ये माझा भयानक अपघात झाला होता, माझ्या जीवनातील सर्वात भयावह तो काळ आणि ते काही दिवस सुद्धा.

तेव्हा अपघात झाल्यानंतर लगेच मला तिथल्या जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. एका दिवसानंतर मला दुसर्या दवाखान्यात हलवण्याचा निर्णय घेतला गेला. घरचे सगळे तिथे नवखेच होते त्यांना माझे दु:खच अनावर होते त्यामुळे माझे मित्रमंडळींच सगळी जबाबदारी पार पाडत होते. तेथून दुसर्या दवाखान्यात हलवण्यासाठी तिथले एका रात्रीत भरमसाठ बिल आले होते ते भरूनच पुढे दुसर्या दवाखान्यात हलवता येणे शक्य होते. दिवसभरात पैसे अरेंज करताही आले असते परंतु ती वेळ महत्वाची होती. स्थानिक मित्रांनी शक्य तेव्हढी ओळख काढून थोडाफार बिल कमी करण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही योग्य कमी झाला नव्हता. त्याच वेळी माझ्या गावाकडील आंबी दुमालाच्या  एका मित्रांने गागरे साहेबांना फोन केला आणि प्रसंग सांगितला... त्याने त्यांना एव्हढंच सांगितले कि आपल्या गावाकडील मुलगा आहे, असेअसे  झाले आहे आणि हा प्रोब्लेम आहे. (त्यावेळी मी नक्की कोण आहे, काय करतो, कुठला आहे, त्यांना काहीच माहित नव्हते).  क्षणाचाही विलंब न लावता मला फक्त हॉस्पिटलचे नाव ,पत्ता,डॉक्टरचे नाव पाठव असे गागरे साहेबांनी मित्राला सांगितले. अवध्या पंधरा मिनिटाच्या कालावधीत स्थानिक लोकप्रतिनिधींचा फोन डॉक्टरप्रशासणाला येऊन बिल कमी कमी झाले होते त्याचवेळी   त्यांनीही मित्राला  फोन करून सांगितले कि फक्त साठ टक्के पैसे भरा,लगेच दिक्चार्ग करा व  दुसर्या दवाखान्यात हलवा आणि तरीही काही प्रोब्लेम आला तर सांगा.

खर सांगायला गेल तर अतिशय संकट समयी आणि खर्या दुखा:च्या काळात सर्वच मित्रांनी आणि स्पेशली गागरे बंधूनी अप्रत्यक्ष केलेली मदत हि माझ्यासाठी खूप मोठी होती.  

काही दिवसानंतर मी बरा झाल्यावर मला हि गोष्ट कळली. मनातच विचार करत होतो...  खरच कोण होतो मी त्यांच्यासाठी, का केलं माझ्यासाठी, सामाजिक बांधिलकी म्हणून कि इंतर काही सगळे प्रश्न माझ्यासाठी अनुतीर्ण होते.

एक कृतज्ञता म्हणून काही दिवसानंतर त्यांचे आभार मानण्यासाठी भेटलो.
तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उमजले. आभार मानताच त्यांनी एक वाक्य सांगितले  कि आपण जेव्हा सामाजिक कार्य करतो तेव्हा ते कोणासाठी करायचे आणि कोणासाठी नाही हे कधीच ठरवायचे नसते. जे काम आपल्या परीने शक्य असेल ते काम आनंदाने करणे म्हणजेच सामाजिक कार्यात स्वताचा आनंद आहे.
आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ देऊन जवळ-जवळ दीड तास त्यांनी माझ्यासाठी दिला.
हुशार, कर्तबगार, निर्णयक्षम, ध्येयवादी, महत्वाकांशी, सहनशील, असे अनेक गुण एकाच व्यक्तिमध्ये पाहण्याचा योग दुर्मिळ असतो पण मला ते त्यांच्यामध्ये दिसले. एक यशस्वी उद्योजक असल्यामूळ उच्चशिक्षण आणि करियर याबद्दल एक योग्य असे मार्गदर्शन मिळाले.
माझ्या गावात चालू असलेले अनेक उल्लेखनीय कामे त्यात महिला बचत गट असेल,पाणलोट क्षेत्र प्रकल्प असेल तरुणानाची एकता फौन्डेषण असो किंवा इतरही अनेक गोष्टी त्यांनी बारकाईने जाऊन घेतल्या आणि सदैव अशा प्रकारच्या प्रत्येक चांगल्या कामात आमचा पाठींबाच आणि सहभाग राहील असेहि त्यांनी सांगितले.
नुसते सांगितले नाही तर पुढील काळात त्याचा प्रत्यक्षात अनुभव देखील दिला यातून खरच त्यांचा प्रत्येक गोष्ठीमधला सहभाग जाणवला.  

खरच मी खूप भावनाविवश झालो होतो....!

असो....

परंतु त्यांच्या काही गोष्ठी मला खूप प्रेरनादायी ठरल्या आहेत,
कधीही कुठेहि भेटले तरी पहिले करियरबद्दल विचारणा आणि त्याचे योग्य मार्गदर्शन, कारण त्यांचे म्हणणे असे आहे कि आपल्या खेड्यातील मुलांनी पहिले उच्चशिक्षण घेऊन आपण आपल करियर घडवायचं आणि त्यातून वेळ काढूनच सामाजिक कार्य करायचं. कारण ज्या समाजात, ज्या भागात आपण जन्मलो त्याचे आपण  काहीतरी देणे लागतो हे त्यांचे नेहमीच सांगण असत.
एका सामान्य कुटुंबातील व्यक्ती ते एक यशस्वी उद्योजक हा त्यांचा प्रवास आणि त्यांनतर सामाजिक क्षेत्रात केलेलं उल्लेखनीय काम हे कौतुकस्पद आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांची व्हिजनरी,ध्येयवादी तत्वे दिसतात. त्यांनी केलेल्या कामातून त्यांची कार्यक्षमता दिसते.  त्यांच्या स्वभावातून त्यांची सर्वसामान्यांप्रती असलेली आपुलकी दिसते. पठारभागात स्वखार्तून केलेल्या कामांमुळे त्यांची निस्वार्थी वृत्ती आणि त्यांची निर्णयक्षमता दिसते. राजकारण करण्यापेक्षा समाजकारण हे त्यांचे प्रेम. कारण अनेक उमेदवारांना पक्षाची पदे सांभाळून सामाजिक कामे करणे कठीण जाते कारण त्यांना पक्ष वाढवणे हि मोठी जबाबदारी असते. परंतु गागरे बंधू हे एका पक्षाकडून जरी उभे असतील तरी त्यांना त्या पक्षाची कुठली राजकीय जबाबदारी नाही. अनेक मोठ्या कॉम्पेटीशनमधून त्यांना तिकीट मिळाले आणि ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उभे आहेत तसा वयक्तिक मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा चाहता नाही परंतु एक व्यक्ती म्हणून मी त्यांना साथ देत आहे.

मी आशा करतो कि असा व्यक्ती पठारभागाचे पुढील काळात नेतृत्व करेल आणि असे जर झाले तर त्याचा मला आनंदच होईल कारण त्याचा नक्कीच फायदा सर्वच पठारभागाला होईल. 

शेवटी सर्वांना एकच सांगतो मतदान कोणालाही करा परंतु  या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष बघून नाही तर एक माणूस बघून मतदान करा. जो आपल्या भागाच भवितव्य घडवेल.

Finally choice is yours……! 

✍🏻गणेश सातकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा