Pages

बुधवार, १० मे, २०१७

आठवणीतला एक दिवस ...आपला वाढदिवस

' आठवणीतला एक दिवस ...आपला वाढदिवस '

वर्षभरतला एकच असा दिवस असतो. 

जिथे हृदयात घर केलेले , मनाने खूपच जवळ असलेले , पण जवळ असूनही अंतर राखून असलेले ,
वर्षभरात कधीही न भेटणारे , न बोलणारे , आपल्यावर नजर राखून चुपचाप राहणारे ,
मनात आठवण काढूनही संवाद न साधणारे , ओळखीचे , अनोळखीचे...नेहमीच सहवासात असणारे , सतत बोलणारे , दूर असूनही संवाद साधणारे ,मनाला ओढ लावणारे , प्रेमाने राहणारे...
आपली आवर्जून आठवण काढतात .  आपल्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी.....शुभाशिर्वादांसाठी ...

एखाद SMS करून , किंव्हा फोनवर संवाद साधून किंव्हा प्रत्यक्ष भेटून ...बोलून.. 

तो शुभदिन म्हणजे आपला वाढदिवस .  खरंच अश्यावेळी मन भरून येतं. ...भरल्या आभाळागत ...!
किती हे प्रेम !
 सरत्या पावसाच्या सरींसारखं तन-मन अगदी भिजून जातं ह्या प्रेमाच्या वर्षावात .

नव्या आश्या , नव चेतना पल्लवित करतं. खरंच धन्यता वाटते मनाला ....एक दिलासा मिळतो एकप्रकारे .
तरीही त्यातल्या त्यात कुणी जिवाभावाचं राहीलच एखादं...तर मन खट्टू होतं. हे काही वेगळा सांगायला नको.

वाढदिवसाच्या आधीच पासूनच काहीएक दिवस एक चित्र डोळ्यसमोर उभं राहतं.
किंव्हा आपण ते रंगवलेले असत . अमुक अमुक अस असं होऊ शकतं .
किंव्हा व्हायला हवं. अन त्यानुसार आपण आनंदाच्या विविधरंगीत छटा आपल्या अंगा खांद्यावर खेळवत , इकडून तिकडे सैरवैर बागडत असतो. 

वाढदिवसाच्या वेळी अश्या ह्या प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मन आनंदाच्या लहरी सुगंधामधे   स्व:तहा हरवून जातं .  कारण वर म्हटल्या प्रमाणे ........

कधीही न बोलणारे , न भेटणारे , आपलेच जीवाभावाचे, आपली वर्षभरातुन एकदा का होईना आपली आवर्जून आठवण काढतात . हीच बाबा मनाला स्पर्शून जाते .
आयुष्यात दुसरं तिसरं अजून काय हवं असंत. प्रेमाचा एक चतकोर हि आनंद फुलवण्यास पुरेसा असतो.

असा हा आनंदाचा दिवस .... प्रत्येकाच्या जीवनात वर्षभरातून एकदाच येतो ...आठवणीचा अन शुभेच्छांचा वर्षाव करत ... माझा तर येऊन गेला 22 मार्च...आपलाही येईल अशीच आशा,अपेक्षा आणि समाधान घेऊन.

आपल्या आई वडलांची हि एक मोठी देणगीच आहे. त्यांचेच सर्वप्रथम मनोमन तरी चरण स्पर्श करायला हवे. 

असंच लिहिता लिहिता.....!

✍🏻गणेश ....

गुरुवार, ३० मार्च, २०१७

आपुलकी मायेची

#आपुलकी_मायेची

एखाद्यादिवशी खिशाला पेन नसला म्हणजे दिवसभर काहीतरी हरवल्यासारखं होतं,
माणसाचंही भलतच आहे हा, नाही म्हणजे आयुष्यात कोण कधी कशी जागा व्यापुन घेईल सांगताच येत नाही, मग ती सजिव असो वा निर्जिव. यात अट फक्तं एकच माणसाचं हृदय सजिव असलं पायजे, जिवंत. मग समोरच्या गोष्टीचं अस्तित्व तो मान्य करतोच करतो!!....

लहानपणी एखाद्या गोष्टीच्या हव्यासापोटी घरात तांडव करूनही प्लॅन सक्सेस होत नाही अस दिसताच (म्हणजेच एखादी गोष्ट पाहिजेच आहे आणि ती सर्व काही करून मिळत नाही असे दिसताच ) मी माझ जवळचं हक्काचं आधारकार्ड बाहेर काढायचो, ते म्हणजे काही झालतरी रात्री जेवायचं नाही.....
        

रात्र झाल्यावर भुकेमुळे कधी ह्या कडेवर तर कधी त्या कडेवर लोळलाळ सुरू व्हायची..पोटात पडणार्‍या भुकेच्या आगीने न राहवून अर्ध्यारात्री सर्व झोपलेत अशी खात्री करून मी उठून बत्तीच्या(चिमणी) प्रकाशात भाकरीचे टोपले चाचपाडायचो. तोच, टोपल्यात व्यवस्थित वरून फडक्याने झाकून एक ताट वाढून ठेवलेलं दिसायचं.  मी घास दोन घास खात नाही तोच कुणाचेतरी हात डोक्यावरून मायेनं फिरायचे, .. नजर वर करून बघायचो तर आई किंवा आजी  बाजुला बसलेली दिसायची.

         पोटचं मुल ज्या दिवशी रागारागाने जेवलं नाही खरं सांगतो त्यादिवशी त्याच्याबरोबर घरातल्या माय माऊलीच म्हणजेच आपल्या आईचे पोटही खपाट आहे म्हणुन समजायचं.  आता थोडी समज आल्यानंतर मी हे बोलतोय, अनुभवतोय आणि समजतोय सुद्धा.

माझी आई पण माझ्या बरोबर जेवायची, माझ्याबरोबर ताटात जेवायला लागली की ती वस्तु मिळाली नाही त्या दुःखाने म्हणा की आईच्या मायेने म्हणा डोळ्यातले एक दोन अश्रु ताटात पडायचे, त्याने जेवण्याची चव कधी बदलली नाही उलट अधीकची चव यायची. डोळे डबडबून ताटातली भाकर बत्तीच्या मंद प्रकाशात धुसर होऊन पण डोळ्यातच मोत्यासारखी चमकायची.

परंतु आज खंत एकच आहे कि आज बरेच वर्ष मी बाहेर आहे. तरीही  मला खात्री आहे आजही मी कधी असा झोपलो तर आई तशीच उपाशी राहील माझ्यासाठी ह्यात दुमत नाही....!

थोडा भावनाविवश झालो आहे. होतो कधी-कधी असा मी....
असो....!

    माईची माया अफाट असते ती माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक आईची आपल्या मुलासाठी. बसमध्ये बसलोय, समोरच्या सिटवर एक आई आपल्या लहानशा गोडूल्या बाळाला खिडकीतून बाहेरचा नजारा दाखवत पॉपकॉर्ण  खाऊ घालतेय, हे दृश्य बघून अचानक आईची आठवण झाली. अवघडच आहे माणसाच् कधी काय आठवेल सांगताच येत नाही....!

शेवटी एकच,
राग नको....लोभ हवा.....!

✍🏻 गणेश सातकर